आज खऱ्या गांडूळाची खरी शास्त्रीय माहिती .
खरतर तीन प्रकारची गांडूळं असतात आपल्याकडे. यातलं पहिलं गांडूळ म्हणजे जमिनीच्या वरच्या थरावर रहाणारं एपिजीअल [ पेरिओनिक्स एक्सकॅव्हॅट्स ] गांडूळ. हे गांडूळ फ़क्त जमिनीच्या प्रुष्ठभागावरचे सेंद्रिय पदार्थ खाउन टाकतं.ओला कचरा साफ़ करताना हे साहेब आपल्याला नेहेमी दिसतात.हे गांडूळ रंगाने जांभळट लाल असतं नी जर बोटाने दाबुन पाहिलं तर स्लाईटली खरखरीत लागतं. ह्याच्या शरीराची दोन्ही टोकं आधी करपट काळसर रंगाची असतात आणि शरीर एकदम स्लीक म्हणजे सडसडीत नी साधारण ८ ते १० सेमी लहान असतं.हे गांडूळ इतर गांडूळापेक्षा चपळ तर असतच पण त्याची प्रजनन शक्तीपण भरमसाठ असते. म्हणुनच याला गांडूळखतासाठी उपयुक्त समजलं जातं. ’मातीच्या वरवरच्या थरात रहणारं ’अनसेनिक’ हे दुसऱ्या प्रकारचं गांडूळ’[ लॅपिटो मॉरेटी] खोदकाम करताना आपल्याला अनेकदा दिसतं. या गांडूळाला टाकाऊ पदार्थ आणि ओला हिरवा कचरा म्हणजेच पानांच कचरा खायला लागतो. अनसेनिक गांडूळाचं अंग चांगलं चकचकीत तर असतच पण हे महाराज लठ्ठही असतात. त्याला स्पर्श केला तर हे रबरासारखं लागतं. राखाडी पांढरट असलेलं हे गांडूळ पहिल्यापेक्षा जास्त लांब असतं. साधारण १५ ते १६ सेमी लांब होणारं अनसेनिक गांडूळसुद्धा गांडूळ खतप्रकल्पात वापरलं जातं. रहाता राहिला तिसरा प्रकार म्हणजे ’एण्डोजेइक गांडूळं’ जी मातीच्या आत आत खुप खोल रहातात. ही आपल्या नजरेस जास्त पडत नाहीत कारण ह्यांचा आपल्याशी जास्त "पाला पडत नाही"
लहानपणी यच्चयावत मुलांनी केलेली गोष्ट म्हणजे गांडूळांवर मिठ टाकुन पहाणे. आता हे खुप क्रूर वाटतं पण सगळ्यांनी केलेलं असत. तेव्हा गांडूळ तडफ़डायच. ते का तडफडायचं हे हल्लीहल्ली कळालं. गांडूळाचं शरीर जास्तीतजास्त ओलसर असतं कारण ते त्वचेमार्फ़त श्वसन करतं. याचसाठी त्यांची त्वचा अजिबात कोरडी पडून चालत नाही. म्हणजे जर त्वचा कोरडी झाली किंवा तिच्यातला चिकट्पणा कमी झाला तर गांडूळ मरुन जातं. उदाहरण द्यायच झालं तर , कुठल्याही गांडूळाला टिप कागदावर ठेवलं तर ते लगेच मरुन जातं कारण त्याची त्वचा कोरडी होते नी त्वचेतला ऑक्सिजन संपला की काम खतम ! गांडूळांना खारट पाणी पण सोसत नाही.याच कारण अनेकांना माहीतच नसतं . गांडूळ पाण्यात जास्त दिवस राहू शकत नाही कारण त्यांची जी विष्ठा असते ना, त्यातून अमोनिया बाहेर पडत असतो नी हा पाण्यात जमला की पाणी विषारी होऊन गांडूळ मरुन जातं.
निसर्गात ही गांडूळ कंपनी मोठ्या संख्येने आढळते. बहुतांश लोकांना माहीतच नसत की गांडूळाला पिल्लं कशी होतात? या अज्ञानामागची गम्मत म्हणजे गांडूळ उभयलिंगी आहे. म्हणजे तो नाही की ती नाही ! ज्याला इंग्रजीत hermaphrodite म्हणतात.हर्माफ्रोडाइट असणे म्हणजे हिजडेपण किंवा दर्जाहीन भाषेत छक्का असणे नव्हे तर एकाच शरीरात दोन्ही लिंगांची पूर्तता असणे. असा जीव जो स्वतःच स्वतःची संतती निर्माण करू शकतो. गांडूळ किडा मुंग्या काय अभ्यासायच्या ? असा तुच्छ विचार केल्यास निसर्गातल्या अशा महत्वाच्या माहितीपासून आपण वंचित रहातो . तर असं हे हर्माफ्रोडाईट- पौरुषसंपन्न आणि स्त्रीत्वसंपन्न गुणांनी संपन्न असलेल पुर्ण वाढ झालेलं गांडूळ मिलनानंतर त्याच्या कातडीचा जास्त वाढलेला भाग म्हणजे ’क्लिटेलम’ टाकुन देतात नी त्याचा कोष बनवतात. हा कोष दोन आठवड्यानी उबून त्यातून चिंटुकली गांडूळं बाहेर येतात.प्रत्येक कोषातून साधारण ३ पिल्लं जन्मतात.ही पिल्लं पुर्ण वाढ होण्यासाठी म्हणजेच पुनरुत्पादनासाठी साधारण १५ ते १८ दिवस लागतात. यांच आयुष्य अवघं सहा ते बारा महिने एवढच असल्याने त्यांची संख्या पटापटा वाढण्यासाठी निसर्गाने केलेली किमया आहे. गांडूळांना शत्रु फ़ार ! बेडुक, साप, पक्षी, सरडे, चिचुन्दरी आणि हल्ली माणुसदेखील यांना खातो. ह्या सगळ्यामुळे गरीबाला स्वसंरक्षण म्हणजे लपुन बसणे. रात्रीच्या कमी वर्दळीच्या जमिनीतुन ही कंपनी बाहेर येते.
गांडूळाचे उपयोग खुप आहेत जे मी सांगणे नकोच. ज्या जमिनीत गांडूळ नाही ती जमिन अगदी मृतच म्हणायला हवी. शेताची नांगरणी करुन शेत लावल्यावर तरारलेल्या पिकाला पुन्हा नांगरता येत नाही राव... मग अशा वेळेस मुळांना हवा खेळती ठेवण्याचं काम हे आपले गरीब मित्र करतात. गांडूळ मातीत खाली खाली जातं . ह्याने मातीत छिद्रे होवुन माती सच्छिद्र होते, हवा खेळती राहुन मातीतला पाण्याचा माव वाढतो. गांडूळाने माती खाऊन पचवलेला पाचोळा, माती पचून विष्ठेतून बाहेर पडतो नी हेच बनत गांडूळ खत. ह्या गांडूळांचा आणि जंगलांचापण घनिष्ट संबंध असतो. शेत नांगरण्याच काम माणुस करतो पण जंगल नांगरण्याच काम ही गरीब मंडळी करतात.
तर असं हे परोपकारी गांडूळ.
*आशीर्वाद अर्थप्लस ( जीवन द्रव्य )*
आशीर्वाद अर्थप्लस जमिनीला सुपिकता प्रदान करते. अर्थप्लस ड्रिप किंवा फ्लडने दिल्यावर ड्रिपखाली पाटिभर पांडरी मुळी व हजारो गांडुळ तयार होतात.
जमिनीमध्ये जीवन द्रव्याचा प्रमाण जेवढ जास्त तेवढी जमिन सुपिक बनते. जीवन द्रव्याची निर्मिती काष्ठ पदार्थाच्या विघटनातून (कुजण्यातून) होते.
काष्ठ पदार्थ केवळ पिकांचे अवशेष नसून प्रत्येक सजीवांचे शरीर होय. काष्ठ पदार्थाचे विघटन करणारे अनंतकोटी सूक्ष्मजीवाणु अर्थप्लस दिल्यावर जमिनीत तयार होतात. त्यामध्ये जंतू व बुरशींचा समावेश असतो . म्हणजेच जीवन द्रव्याची निर्मीती, पिकांचे अवशेष सुक्ष्म जीवाणूंच्या कुजण्यातून होते. म्हणजेच ह्युमस च्या निर्मीतीसाठी *काष्ठ पदार्थांचे आच्छादन व अर्थप्लस* ह्या दोन गोष्टीची आवश्यकता असते. गांडुळ 24 तास काम करतात, जमिनीच्या खोलवरील सुपिक,समृद्ध माती खातात व विष्ठेच्या रुपात जमिनीच्या पृष्ठभागावर सतत आणून टाकतात व फळ झाडांच्या मुळांना उपलब्ध करून देतात. ही गांडुळांची विष्ठा अन्नद्रव्यांचा भंडार असते. गांडुळे जमिनीमध्ये वरखाली येण्याजाण्यामुळे जमिनीला अनंत कोटी छीद्र पाडतात.कारण गांडुळे जमिनीतून वर येताना ज्या छिद्रातून वर येतो त्या छिद्रातून खाली जात नाही दर वेळी नवे छिद्र करतो .त्यामुळे जमिनीत अनंत कोटी छिद्र पडतात व पावसाच संपूर्ण पाणी ह्या छीद्रांच्या माध्यमातून जमिनीमध्ये मुरते व भुजलामध्ये जमा होते. हे पाणी पावसाळा संपल्यानंतर केशाकर्षण शक्तीमुळे वर येते व पिकांच्या मुळांना पाणी व अन्न उपलब्ध होते.
आशीर्वाद अर्थप्लस जमिनीत जाताच गांडुळ सक्रीय होतात ते जमिनीच्या पृष्ठभागाकडे यायला लागतात. जमीनीत खोलवर अन्नद्रव्यांचा महासागर असतोे आणि गांडूळ जेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर यायला लागतात तेव्हा ते, खोलवरील ही खनिज समृद्ध माती, वाळूचे कण, चुनखडी, आपल्या सोबत वर आणतात या जमिनीतील रोग निर्माण करणारे राक्षस जंतू खातात व त्यांना नष्ठ करतात. परंतु त्याच वेळेला जमिनीमध्ये असलेले उपयुक्त जंतू व बुर्शी गिळतात ,मात्र त्यांना नष्ठ करीत नाहीत . उलट या जंतूना बलवान सचेतन व कार्यशील करुण विश्टेवाते वर जमीनिवरआणून सोडतात॰गांडुळाच्या आतडीमध्ये अशी काही पिसार्इ यंत्रणा (ग्राईंडींग मशीन) असते की खाल्लेले सर्व पिसून काढले जाते. व त्यापसुन तयार झालेली विष्ठा, गांडुळ जमिनीच्या पृष्ठभागावर आणून रोपांच्या ,पिकांच्या मुळीपाशी आणून टाकतात. गांडुळ ज्या छिद्रामधून वर आलेत त्या छिद्रातून ते पुन्हा प्रवेश करत नाहीत तर दर वेळी दुसरे छीद्र पाडून जमिनीमध्ये घुसतात व तिसर्या छीद्रातून वर येतात व विष्ठा जमिनीवर टाकतात. गांडुळ जाता येता आपल्या शरिरांमधून वर्मीवाश स्प्रे करतात आणि छिद्रांच्या भिंती लिंपून टाकतात. या स्त्रावामध्ये जीवाणूंच्या जगण्याला आवश्यक व मुळांच्या विकासासाठी आवश्यक विशिष्ट संजीवकं , पोषणद्रव्य , आमिनो आम्ल व प्रतिकारशक्ती वाढविणारे , प्रतीपिंड असतात. ही गांडुळ 24 तास जमिनीमध्ये खालीवर करत असतात व जमिनीला अनंत कोटी छीद्र पाडत असतात. कितीही पाऊस पडला तरीही संपूर्ण पावसाचे पाणी ह्या छीद्रांमधून झिरपल्या जाते व जमिनी अंतर्गत भुजलामध्ये संग्रहीत होतो. व नैसर्गिक पाणलोटक्षेत्र व्यवस्थापन तयार होते.
गांडूळाच्या विष्ठेमध्ये
सगळया खनिजांचे अनंत भंडार असते. त्या विष्ठेमध्ये भोवतालच्या मातीपेक्षा 7 पट जास्त नाट्रोजन असतो, 9 पट जास्त स्फुरद(फॉस्फेट), 11 पट जास्त, पलाश(पोटॅश), 8 पट चुना(कॅल्शीअम), 10 पट मग्न(मॅग्नेशिअम), 10 पट गंधक (सल्फर), ह्या सोबतच बाकीचे खनिजं जास्त प्रमाणात असतात. ही गांडुळांची विष्ठा मुळाजवळ येऊन पडते, त्यातील सर्व अन्नद्रव्य मुळयांना मिळतात व
सोबतच विष्ठेमध्ये असणारे उपयुक्त जंतू नवीन ताकद आणि स्फूर्ती घेऊन ह्युमसच्या निर्मीतीच्या कामाला लागतात.
खरतर तीन प्रकारची गांडूळं असतात आपल्याकडे. यातलं पहिलं गांडूळ म्हणजे जमिनीच्या वरच्या थरावर रहाणारं एपिजीअल [ पेरिओनिक्स एक्सकॅव्हॅट्स ] गांडूळ. हे गांडूळ फ़क्त जमिनीच्या प्रुष्ठभागावरचे सेंद्रिय पदार्थ खाउन टाकतं.ओला कचरा साफ़ करताना हे साहेब आपल्याला नेहेमी दिसतात.हे गांडूळ रंगाने जांभळट लाल असतं नी जर बोटाने दाबुन पाहिलं तर स्लाईटली खरखरीत लागतं. ह्याच्या शरीराची दोन्ही टोकं आधी करपट काळसर रंगाची असतात आणि शरीर एकदम स्लीक म्हणजे सडसडीत नी साधारण ८ ते १० सेमी लहान असतं.हे गांडूळ इतर गांडूळापेक्षा चपळ तर असतच पण त्याची प्रजनन शक्तीपण भरमसाठ असते. म्हणुनच याला गांडूळखतासाठी उपयुक्त समजलं जातं. ’मातीच्या वरवरच्या थरात रहणारं ’अनसेनिक’ हे दुसऱ्या प्रकारचं गांडूळ’[ लॅपिटो मॉरेटी] खोदकाम करताना आपल्याला अनेकदा दिसतं. या गांडूळाला टाकाऊ पदार्थ आणि ओला हिरवा कचरा म्हणजेच पानांच कचरा खायला लागतो. अनसेनिक गांडूळाचं अंग चांगलं चकचकीत तर असतच पण हे महाराज लठ्ठही असतात. त्याला स्पर्श केला तर हे रबरासारखं लागतं. राखाडी पांढरट असलेलं हे गांडूळ पहिल्यापेक्षा जास्त लांब असतं. साधारण १५ ते १६ सेमी लांब होणारं अनसेनिक गांडूळसुद्धा गांडूळ खतप्रकल्पात वापरलं जातं. रहाता राहिला तिसरा प्रकार म्हणजे ’एण्डोजेइक गांडूळं’ जी मातीच्या आत आत खुप खोल रहातात. ही आपल्या नजरेस जास्त पडत नाहीत कारण ह्यांचा आपल्याशी जास्त "पाला पडत नाही"
लहानपणी यच्चयावत मुलांनी केलेली गोष्ट म्हणजे गांडूळांवर मिठ टाकुन पहाणे. आता हे खुप क्रूर वाटतं पण सगळ्यांनी केलेलं असत. तेव्हा गांडूळ तडफ़डायच. ते का तडफडायचं हे हल्लीहल्ली कळालं. गांडूळाचं शरीर जास्तीतजास्त ओलसर असतं कारण ते त्वचेमार्फ़त श्वसन करतं. याचसाठी त्यांची त्वचा अजिबात कोरडी पडून चालत नाही. म्हणजे जर त्वचा कोरडी झाली किंवा तिच्यातला चिकट्पणा कमी झाला तर गांडूळ मरुन जातं. उदाहरण द्यायच झालं तर , कुठल्याही गांडूळाला टिप कागदावर ठेवलं तर ते लगेच मरुन जातं कारण त्याची त्वचा कोरडी होते नी त्वचेतला ऑक्सिजन संपला की काम खतम ! गांडूळांना खारट पाणी पण सोसत नाही.याच कारण अनेकांना माहीतच नसतं . गांडूळ पाण्यात जास्त दिवस राहू शकत नाही कारण त्यांची जी विष्ठा असते ना, त्यातून अमोनिया बाहेर पडत असतो नी हा पाण्यात जमला की पाणी विषारी होऊन गांडूळ मरुन जातं.
निसर्गात ही गांडूळ कंपनी मोठ्या संख्येने आढळते. बहुतांश लोकांना माहीतच नसत की गांडूळाला पिल्लं कशी होतात? या अज्ञानामागची गम्मत म्हणजे गांडूळ उभयलिंगी आहे. म्हणजे तो नाही की ती नाही ! ज्याला इंग्रजीत hermaphrodite म्हणतात.हर्माफ्रोडाइट असणे म्हणजे हिजडेपण किंवा दर्जाहीन भाषेत छक्का असणे नव्हे तर एकाच शरीरात दोन्ही लिंगांची पूर्तता असणे. असा जीव जो स्वतःच स्वतःची संतती निर्माण करू शकतो. गांडूळ किडा मुंग्या काय अभ्यासायच्या ? असा तुच्छ विचार केल्यास निसर्गातल्या अशा महत्वाच्या माहितीपासून आपण वंचित रहातो . तर असं हे हर्माफ्रोडाईट- पौरुषसंपन्न आणि स्त्रीत्वसंपन्न गुणांनी संपन्न असलेल पुर्ण वाढ झालेलं गांडूळ मिलनानंतर त्याच्या कातडीचा जास्त वाढलेला भाग म्हणजे ’क्लिटेलम’ टाकुन देतात नी त्याचा कोष बनवतात. हा कोष दोन आठवड्यानी उबून त्यातून चिंटुकली गांडूळं बाहेर येतात.प्रत्येक कोषातून साधारण ३ पिल्लं जन्मतात.ही पिल्लं पुर्ण वाढ होण्यासाठी म्हणजेच पुनरुत्पादनासाठी साधारण १५ ते १८ दिवस लागतात. यांच आयुष्य अवघं सहा ते बारा महिने एवढच असल्याने त्यांची संख्या पटापटा वाढण्यासाठी निसर्गाने केलेली किमया आहे. गांडूळांना शत्रु फ़ार ! बेडुक, साप, पक्षी, सरडे, चिचुन्दरी आणि हल्ली माणुसदेखील यांना खातो. ह्या सगळ्यामुळे गरीबाला स्वसंरक्षण म्हणजे लपुन बसणे. रात्रीच्या कमी वर्दळीच्या जमिनीतुन ही कंपनी बाहेर येते.
गांडूळाचे उपयोग खुप आहेत जे मी सांगणे नकोच. ज्या जमिनीत गांडूळ नाही ती जमिन अगदी मृतच म्हणायला हवी. शेताची नांगरणी करुन शेत लावल्यावर तरारलेल्या पिकाला पुन्हा नांगरता येत नाही राव... मग अशा वेळेस मुळांना हवा खेळती ठेवण्याचं काम हे आपले गरीब मित्र करतात. गांडूळ मातीत खाली खाली जातं . ह्याने मातीत छिद्रे होवुन माती सच्छिद्र होते, हवा खेळती राहुन मातीतला पाण्याचा माव वाढतो. गांडूळाने माती खाऊन पचवलेला पाचोळा, माती पचून विष्ठेतून बाहेर पडतो नी हेच बनत गांडूळ खत. ह्या गांडूळांचा आणि जंगलांचापण घनिष्ट संबंध असतो. शेत नांगरण्याच काम माणुस करतो पण जंगल नांगरण्याच काम ही गरीब मंडळी करतात.
तर असं हे परोपकारी गांडूळ.
*आशीर्वाद अर्थप्लस ( जीवन द्रव्य )*
आशीर्वाद अर्थप्लस जमिनीला सुपिकता प्रदान करते. अर्थप्लस ड्रिप किंवा फ्लडने दिल्यावर ड्रिपखाली पाटिभर पांडरी मुळी व हजारो गांडुळ तयार होतात.
जमिनीमध्ये जीवन द्रव्याचा प्रमाण जेवढ जास्त तेवढी जमिन सुपिक बनते. जीवन द्रव्याची निर्मिती काष्ठ पदार्थाच्या विघटनातून (कुजण्यातून) होते.
काष्ठ पदार्थ केवळ पिकांचे अवशेष नसून प्रत्येक सजीवांचे शरीर होय. काष्ठ पदार्थाचे विघटन करणारे अनंतकोटी सूक्ष्मजीवाणु अर्थप्लस दिल्यावर जमिनीत तयार होतात. त्यामध्ये जंतू व बुरशींचा समावेश असतो . म्हणजेच जीवन द्रव्याची निर्मीती, पिकांचे अवशेष सुक्ष्म जीवाणूंच्या कुजण्यातून होते. म्हणजेच ह्युमस च्या निर्मीतीसाठी *काष्ठ पदार्थांचे आच्छादन व अर्थप्लस* ह्या दोन गोष्टीची आवश्यकता असते. गांडुळ 24 तास काम करतात, जमिनीच्या खोलवरील सुपिक,समृद्ध माती खातात व विष्ठेच्या रुपात जमिनीच्या पृष्ठभागावर सतत आणून टाकतात व फळ झाडांच्या मुळांना उपलब्ध करून देतात. ही गांडुळांची विष्ठा अन्नद्रव्यांचा भंडार असते. गांडुळे जमिनीमध्ये वरखाली येण्याजाण्यामुळे जमिनीला अनंत कोटी छीद्र पाडतात.कारण गांडुळे जमिनीतून वर येताना ज्या छिद्रातून वर येतो त्या छिद्रातून खाली जात नाही दर वेळी नवे छिद्र करतो .त्यामुळे जमिनीत अनंत कोटी छिद्र पडतात व पावसाच संपूर्ण पाणी ह्या छीद्रांच्या माध्यमातून जमिनीमध्ये मुरते व भुजलामध्ये जमा होते. हे पाणी पावसाळा संपल्यानंतर केशाकर्षण शक्तीमुळे वर येते व पिकांच्या मुळांना पाणी व अन्न उपलब्ध होते.
आशीर्वाद अर्थप्लस जमिनीत जाताच गांडुळ सक्रीय होतात ते जमिनीच्या पृष्ठभागाकडे यायला लागतात. जमीनीत खोलवर अन्नद्रव्यांचा महासागर असतोे आणि गांडूळ जेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर यायला लागतात तेव्हा ते, खोलवरील ही खनिज समृद्ध माती, वाळूचे कण, चुनखडी, आपल्या सोबत वर आणतात या जमिनीतील रोग निर्माण करणारे राक्षस जंतू खातात व त्यांना नष्ठ करतात. परंतु त्याच वेळेला जमिनीमध्ये असलेले उपयुक्त जंतू व बुर्शी गिळतात ,मात्र त्यांना नष्ठ करीत नाहीत . उलट या जंतूना बलवान सचेतन व कार्यशील करुण विश्टेवाते वर जमीनिवरआणून सोडतात॰गांडुळाच्या आतडीमध्ये अशी काही पिसार्इ यंत्रणा (ग्राईंडींग मशीन) असते की खाल्लेले सर्व पिसून काढले जाते. व त्यापसुन तयार झालेली विष्ठा, गांडुळ जमिनीच्या पृष्ठभागावर आणून रोपांच्या ,पिकांच्या मुळीपाशी आणून टाकतात. गांडुळ ज्या छिद्रामधून वर आलेत त्या छिद्रातून ते पुन्हा प्रवेश करत नाहीत तर दर वेळी दुसरे छीद्र पाडून जमिनीमध्ये घुसतात व तिसर्या छीद्रातून वर येतात व विष्ठा जमिनीवर टाकतात. गांडुळ जाता येता आपल्या शरिरांमधून वर्मीवाश स्प्रे करतात आणि छिद्रांच्या भिंती लिंपून टाकतात. या स्त्रावामध्ये जीवाणूंच्या जगण्याला आवश्यक व मुळांच्या विकासासाठी आवश्यक विशिष्ट संजीवकं , पोषणद्रव्य , आमिनो आम्ल व प्रतिकारशक्ती वाढविणारे , प्रतीपिंड असतात. ही गांडुळ 24 तास जमिनीमध्ये खालीवर करत असतात व जमिनीला अनंत कोटी छीद्र पाडत असतात. कितीही पाऊस पडला तरीही संपूर्ण पावसाचे पाणी ह्या छीद्रांमधून झिरपल्या जाते व जमिनी अंतर्गत भुजलामध्ये संग्रहीत होतो. व नैसर्गिक पाणलोटक्षेत्र व्यवस्थापन तयार होते.
गांडूळाच्या विष्ठेमध्ये
सगळया खनिजांचे अनंत भंडार असते. त्या विष्ठेमध्ये भोवतालच्या मातीपेक्षा 7 पट जास्त नाट्रोजन असतो, 9 पट जास्त स्फुरद(फॉस्फेट), 11 पट जास्त, पलाश(पोटॅश), 8 पट चुना(कॅल्शीअम), 10 पट मग्न(मॅग्नेशिअम), 10 पट गंधक (सल्फर), ह्या सोबतच बाकीचे खनिजं जास्त प्रमाणात असतात. ही गांडुळांची विष्ठा मुळाजवळ येऊन पडते, त्यातील सर्व अन्नद्रव्य मुळयांना मिळतात व
सोबतच विष्ठेमध्ये असणारे उपयुक्त जंतू नवीन ताकद आणि स्फूर्ती घेऊन ह्युमसच्या निर्मीतीच्या कामाला लागतात.
No comments:
Post a Comment