Tuesday, 1 May 2018

शेततळ्याचे प्रकार.

शेततळ्याचे प्रकार.
◆शेततळ्याचे दोन प्रकार आहेत
१) सामुदायिक शेततळे.
सामुदायिक शेततळे दोन किंवा त्यापेक्षा जादा शेतकरी लाभार्थी असलेले सामुदायिक क्षेत्र हे साधारणपणे पाणलोट क्षेत्राच्या जवळ निरुपयोगी जमिनीवर किंवा नाल्याजवळील नापिक जमिनीवर खोदता येईल. याचा मुख्य उद्देश असेल नाल्यातले पाणी साठवणे अन्यथा जे वाहून जाईल. साठवलेलं पाणी जमिनीत मुरेल आणि भूगर्भातल्या पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होईल. विहिरी आणि बोअरवेल यांचे पुनर्भरण होईल ज्यामुळे संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होईल.

२) वैयक्तिक शेततळे.
एकाच लाभार्थीच्या क्षेत्रावर वैयक्तिकरित्या घेतले जाते हे साधारणपणे शेतकऱ्यांच्या शेताच्या हद्दीत खोदले/ बांधलं जातं. हे त्यावेळी बांधले जाते ज्यावेळी सिंचनासाठी शेतकऱ्याकडे विहीर, बोअरवेल किंवा उपसा सिंचनाचा स्त्रोत नसेल अश्यावेळी तो जमिनीच्या त्या भागात शेततळे बांधेल जिथे पाण्याचे प्रवाह एकत्र वाहून येतात. अश्या शेततळ्यामुळे त्याला त्या जमिनीवर पिक घेण्यासाठी पाण्याच्या पुरवठ्याची खात्री मिळते जी पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे पडीक राहून जाईल.

◆शेततळ्यासाठी जागा निवड.
जी जागा नाल्याच्या बाजूला आहे अश्या जागेला प्राथमिकता द्यावी जवळपास कुठेही नाला नसल्यास तुमच्या शेतातून एखादा अगदी छोटा ओहोळ किंवा जलवाहिनी वहात असेल अशी जागा असू शकेल अशी जागा निवडण्यात यावी ज्यात ओहोळामधून वाहून येणारे सर्व पाणी सुलभतेने जमा करता येईल शेततळं अश्याही जागांवर बांधता येईल जिथे जवळ असलेल्या मोठ्या नाल्यातून किंवा नदीतून पाण्याची उचल करता येईल.

◆शेततळ्यासाठी जमीनीची प्रत महत्वाची.
निवडलेल्या जमिनीवरची माती सुलभतेने खोदता येत आहे याची खात्री करा जर जमिनीवर मुरूम किंवा कठीण खडक असेल तर जास्त खोल शेततळे खोदणे कठीण होईल आणि या शेततळ्याची साठवण क्षमता खूप कमी असेल. गाळाची माती चिकणमाती किंवा काळी माती ही शेततळं खोदण्यासाठी उत्कृष्ट आहे.

◆शेततळे खुदाईचे आकारमान.
शासनाने शेततळ्याचे सात वेगवेगळे आकारमान मंजूर केले आहेत. सर्व प्रकारांमध्ये शेततळ्याची खोली ही तीन मीटर इतकी निश्चित केली आहे.

◆शेततळ्याची लांबी,रुंदी पुढील प्रमाणे वेगवेगळी असेल.
*१)* १५ x १५ मीटर्स,
*२)* १५ x २० मीटर्स,
*३)* २० x २० मीटर्स,
*४)* २० x २५ मीटर्स,
*५)* २५ x २५ मीटर्स,
*६)* २५ x ३० मीटर्स
*७)* ३० x ३० मीटर्स.
शेताची गरज आणि सरकारी योजना ज्यातून निधी प्राप्त होणार आहे या अनुसार विशिष्ट आकार निवडला जाईल.

◆शेततळे बांधकाम.
शेततळ्याचे सर्वसामान्य माप ३०x ३०x ३ मीटर इतके घेतले जाते. यासाठी किमान ४४ x ४४ मीटर इतक्या आकाराच्या जागेची गरज आहे. एकात एक असे तीन चौकोन चिन्हांकित करून बांधकामाची सुरुवात होईल. सर्वात बाहेरच्या चौकोनाचे माप हे अर्थातच ४४ x ४४ मीटर इतके म्हणजे जागेच्या आकाराचे आहे. ३० x ३० मीटर आकाराचा दुसरा चौकोन आहे, जो तळ्याच्या चार बाजू चिन्हांकित करतो. सर्वात आतला चौकोन २४ x २४ मीटरचा आहे. जो तळ्याचा तळ चिन्हांकित करतो.

◆चौकोन कसे आखावेत.
आतले दोन चौकोन काळजीपूर्वक आखायला हवेत ज्यामुळे ते बरोबर कोनात आहेत याची खात्री मिळेल. यासाठी प्रथम आपण दोरीने एक तळरेषा निश्चित करायची आहे जी तळ्याच्या चार बाजू पैकी एक बाजू निश्चित करेल. दगडाचा खुणेसाठी वापर करत आपण ही दोरी या रेषेच्या शेवटी काटकोनात वळवू दोरीच्या या वळणाचा कोन काळजीपूर्वक सुस्थित करावा जोवर ३ x ४ x ५ मीटरचा त्रिकोण साधला जात नाही यामुळे चारही कोपरे हवे तसे ९० अंशाचे आहेत याची खात्री मिळेल ही पध्दत वापरून आपण खडूने पहिल्यांदा बाहेरचा ३० x ३० मीटरचा चौकोन आणि त्यानंतर आतला २४ x २४ मीटर्सचा चौकोन आखून घेवू

◆चौकोन कसे खोदावे.
सर्वात आधी आतला २४ x २४ मीटरचा चौकोन खोदून सुरुवात करा. हा तीन मीटर खोलीचा अचूक चौकोनी आकार खोदून घ्यावा. या नंतर मशीन जमिनीच्या पातळीवर आणा आणि काळजीपूर्वक भिंती खरवडून चारही बाजुकडून तळापर्यंत उतार तयार करा ज्यामुळे तो जोराच्या वाऱ्यामुळे किंवा पावसामुळेही जागेवरून हलणार नाही. जनावरे जसे की कुत्रे व गाईगुरांपासून या कागदाला सांभाळाव लागेल. ते तळ्यात शिरून कागद हलवू शकतील किंवा फाडू शकतील याकरीता तळ्याच्या चारही बाजूना मजबूत कुंपण उभारावे लागेल जे या जनावरांना तळ्यापासून यशस्वीरीत्या दूर ठेवेल.

◆पेपर आच्छादनामध्ये शेतकऱ्याची भूमिका काय असेल.
तळ्याच्या तळावर हा पेपर अच्छादून देण्याची जबाबदारी कंपनीची असेल.
याकामी लागणारी मजूरी अंदाजपत्रकात अंतर्भूत असेल पेपर हा बरोबर ५०० मायक्रोन जाडीचाच आहे याची खात्री मात्र शेतकऱ्याने करून घेण गरजेचं आहे या कागदावर ISI चिन्ह असल्याचं आणि सरकारमान्य कंपनीकडूनच हा पुरवठा झाला असल्याबद्दलही शेतकऱ्याने तपासून घ्यावं पेपर सप्लायरला पेपरची पूर्ण रक्कम आधीच देवून टाकू नये पेपर पसरवून झाल्यानंतर जर पेपरमधून गळती होत असल्यास कंपनीकडून त्याची दुरुस्ती करवून घेणे हे तुमच्यासाठी अवघड होवून बसेल पेपर पसरवून झाल्यावर एका महिन्याच्या आत त्यावर पाणी जमा करणे आवश्यक आहे. पेपर जर सूर्याच्या उन्हात पाण्याशिवाय जास्त काळ उघडा राहिला तर त्याच्या गुणवत्तेत फरक पडू शकतो पेपर ऑगस्ट महिन्यात पावसाचा पहिला टप्पा पार पडल्यावर पसरवणे हे आदर्शवत असेल पावसाचा दुसरा टप्पा सुरु होण्याआधी तो पाण्याने भरला जाईल वैकल्पिकरित्या डीजेल किंवा विजेवर चालणारा पंप वापरून पाणी उपसा करून तळ्यात भरू शकतो.

◆वाफेने पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने होणाऱ्या नुकसानाचे काय.
जास्त कालावधीपर्यंत जेंव्हा तळ्यात पाणी राहिल तेंव्हा बरेच पाणी हे बाष्पीभवनामुळे वाफ होईल हे कमी करण्याकरिता अनेक पध्दती वापरता येतील. काही शेतकरी कोलीन नावाच्या रसायनाचा वापर करतात, पाण्याच्या पृष्ठभागावर हे रसायन तेलासारखे पसरवतात समस्या अशी आहे की जर एखाद्याने हे रसायन वापरलं तर ते या पाण्यात मस्यशेती करू शकत नाही कारण हे रसायन माश्यांसाठी विषारी असतं.
◆पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्याचा दुसरा मार्ग आहे तळ्यात पक्षीपालन करणे.
तरंगत्या पृष्ठभागावर पिंजऱ्यात कोंबडीची पिल्ले ठेवल्यास त्यामुळे पाण्याला सुर्यकिरणांपासून वाचवता येईल यामुळे ५०% इतकं पाणी बाष्पीभवन होण्यापासून वाचवता येईल पक्षांची विष्ठा पाण्यात पडेल आणि पाण्यातील मासे ते खातील हा एक नाविन्यपूर्वक उपाय होईल. पक्षी पालन आणि मस्य पालनापासून शेतकऱ्याला चांगली मिळकत तर मिळेलच पण विष्ठामिश्रीत पाण्यामुळे पाणी पोषकतत्वयुक्त होईल आणि पिकांसाठी ते आदर्शवत असेल.

◆शेततळ्यातील पाणीसाठा मोजणे.

आपण तयार केलेल्या शेततळ्यातील पाणीसाठा किती आहे हे कळल्यावर त्याप्रमाणे आपण कोणती लागवड करावयाची व किती पाणी मिळेल याचे गणित तयार करता येईल यासाठी आपल्याला शेतातील पाणीसाठा कसा मोजायचा ते पाहू पाणीसाठा हा नेहमी
*लांबी, रुंदी आणि उंची* यावर अवलंबून असतो प्रथम आपण लांबी,रुंदी पाहू या

समजा तळ्याची वरची लांबी १२ फूट आणि रुंदी १०  फूट आहे. जसे जसे आपण खाली जाऊ तसे लांबी व रुंदी कमी होत जाते. यासाठी प्रथम सरासरी लांबी, सरासरी रूंदी काढली पाहीजे. समजा वरची लांबी १२ फूट व तळातील लांबील ८ फूट आहे यासाठी सरासरी लांबी काढली पाहीजे ती अशी काढता येते
सरासरी लांबी : १२+८÷२ =१० फूट
आता वरची रुंदी १० फूट आहे व तळातील रूंदी ६ फूट आहे. आता आपल्याला सरासरी रूंदी  काढली पाहीजे
*सरासरी रुंदी :* १० + ६ ÷ २ = ८ फूट म्हणजे सरासरी लांबी १० फूट व सरासरी रूंदी ८ फूट आली आता  तळ्याची उंची २० फूट आहे.

◆पाणीसाठा काढण्याचे सूत्र.
पाणीसाठा = लांबी x रुंदी x उंची
पाणीसाठा =   १० x  ८  x २०
पाणीसाठा = १६०० क्युबिक फूट

*१ क्युबिक फीट  = २८.३७  लिटर्स*
आता आपण या क्युबिक मधील पाणीसाठा  लिटर मध्ये रूपांतरित करू

पाणीसाठा =१६०० x २८.३७
पाणीसाठा = ४५३९२ लिटर्स
तर मित्रानो १०x८x२० तळे असेल तर त्या तळ्यामध्ये ४५३९२ लिटर्स इतका पाणीसाठा होईल अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या गरजे नुसार शेततळे उभारू शकता. पासाळयात शेततळ्याच्या विसपट पाणी भूगर्भात जिरवले जाते म्हणजे ४५३९२ लीटर × २० पट =९०७८४० लीटर म्हणजेच आपण जर आपल्या शेतात एक शेततळे बांधले तर ९० लाख लीटर पाणी जमिनीत जिरविले जाईल.

◆अनुदानासाठी शासनाच्या योजना.
शेततळ्यासाठी निधीपुरवठा करणाऱ्या तीन शासकीय योजना आहेत
१) मनरेगा
ज्यात फक्त शेततळे खोदण्याचा खर्च भरून मिळतो या योजने अंतर्गत पहिले एक मीटर पर्यंतचे खोदकाम हे मजुरांनी करणे अनिवार्य आहे खडकाळ जमीन किंवा कठीण जमिनीमुळे जर हे शक्य झाले नाही तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

२) मागेल त्याला शेततळं
यात तुम्हाला यंत्राद्वारे काम करण्याची परवानगी आहे आणि जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार इतके अनुदान दिले जाते. कमीतकमी आकारमानानूसार शेततळं खोदण्यासाठी अंदाजपत्रकानुसार अनुदान दिले जाते. शासकीय अनुदानापेक्षा जादा होणारा खर्च शेतकऱ्याला स्वतःहा करावा लागेल.

३) राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
अंतर्गत ही तिसरी योजना आहे जी शेततळ्यासाठी निधी पुरवते या योजने अंतर्गत अर्धे खोदलेले तळे हे मान्यताप्राप्त डिझाईन आहे या नमुन्यामध्ये तळे जमिनीत दोन मीटर खोल खोदले जाते आणि खोदलेल्या मातीचा अधिकचा तीन मीटर उंच ढीग लावला जातो या योजनेत १००% निधी पुरवठा होतो यात खोदकाम पेपरचा खर्च आणि कुंपणखर्च अंतर्भूत आहे पण या योजनेची अट अशी आहे की हे शेततळे सामुदायिक तळे असावे एकट्या शेतकऱ्याला या योजनेमधून निधी मिळत नाही. कमीत कमी दोन किंवा अधिक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावा दुसरी अट अशी की तळ्याच्या पाण्यातून सिंचन केलेल्या जमिनीत शेतकऱ्याने फलोत्पादन, भाज्या किंवा फुलांची रोपांची लागवड करावी या दोन्ही अटी पूर्ण झाल्यास पाच लाख छप्पन्न हजार इतकी रक्कम ४४ x ४४ x ५ मीटर इतक्या आकाराचे तळे बांधण्यासाठी मिळते.

◆शेततळ्यात साठवलेले पाणी कसे वापरले जाऊ शकेल.
शेततळं हे शेतापेक्षा उंच भागात असेल तर पाणी हाताने सायफन पद्धतीने वापरात आणले जाऊ शकते जर तुमचे शेततळं हे तुमच्या शेतापेक्षा खालच्या पातळीत असेल तर तुम्हाला विजेवर चालणारा किंवा डीजेल पंप वापरावा लागेल. लक्षात ठेवा शेततळ्यातील पाणी हे मर्यादित आहे आणि त्याचा वापर संरक्षित सिंचन म्हणून व्हायला हवा कमी पाण्याची गरज असणारे फलोत्पादन लागवड, भाज्या आणि फुलशेतीला प्राधान्य दिला गेले पाहिजे सिंचन हे ठिबक सिंचन पध्दतीने केले जावे ज्यामुळे पाण्याचा वापर जास्त कार्यक्षमतेने होईल दुष्काळावर उपाय म्हणून जास्तीत जास्त शेतकरी हे शेततळे बांधत आहेत.

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...