शेतामध्ये मीठाचा वापर कसा?
मराठवाडा व महाराष्ट्रातील इतर काही भागांमध्ये पावसाने दडी मारली असली तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. थोडाही वेळ वाया न घालवता एकरी १५ किलो (खर्च फक्त ४५ ते ६० रुपये) खडे मीठ शेतात फेकून द्यावे. मीठ वातावरणातील आर्द्रता शोषून घेऊन पिकांना पाणी पुरवत राहते व पिके केवळ जिवंतच राहत नाहीत तर त्यांची जोमदार वाढही होते. हे सदर सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जे अनेक प्रश्न विचारले त्यातील काहींची उत्तरे.
प्र. : मिठाचा वापर कोणत्या प्रकारे व कोणत्या प्रमाणात करावा?
१. जमिनीत : एकरी ५० किलो मीठ शेतात फेकून त्यानंतर नांगरटी.
पीक १५ दिवसांचे झाल्यानंतर एकरी १५ किलो व त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने एकरी १५ किलो. फळझाडांसाठी हेच प्रमाण याच अंतराने पण रिंग पध्दतीने किंवा ड्रिपमधून.
२. कीटकनाशक म्हणून फवारणी करण्यासाठी : १ लीटर पाण्यात ५ ग्रॅम. (पाठीवरच्या साध्या पंपात ७५ ग्रॅम.) हे प्रमाण वाढविल्यास पिकांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
३. तणनाशक म्हणून फवारणी करण्यासाठी : १ लीटर पाण्यात २० ग्रॅम. (पाठीवरच्या साध्या पंपात ३०० ग्रॅम.) तणनाशक म्हणून तयार केलेले मिठाचे द्रावण मुख्य पिकावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
४. लव्हाळं व नागरमोथ्यासारख्या कंदवर्गीय तणांचा नाश करण्यासाठी साध्या पंपात ३०० ग्रॅम मिठाबरोबर एक मुठभर युरिया अवश्य टाकावा. युरियामुळे मीठ आंतरप्रवाही क्रियेने कंदांपर्यंत पोहोचून त्यांचा नाश करते. तणं जितकी कोवळी असतील तितका लवकर परिणाम होईल. गाजर गवताला मीठ जाळून टाकतं.
प्र. : रासायनिक खते व समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेले मीठ यात कोणता फरक आहे?
रासायनिक खते
१. नत्र, स्फुरद, पालाश ही केवळ ३ द्रव्ये उपलब्ध.
२. पिकांना दिल्यानंतर किडींची संख्या वाढते.
३. योग्य प्रमाणात न वापरल्यास पिकांच्या वाढीवर अयोग्य परिणाम होतो.
४. जमिनीतील जिवाणूंची संख्या कमी होते.
५. वर्षानुवर्षे वापरल्यास जमीन नापीक होते.
६. अत्यंत महागडी आहेत.
खडे मीठ
१. तब्बल ८२ द्रव्यांचा खजिना.
२. जमिनीतून दिल्यावर किंवा पिकांवर फवारल्यावर किडी दूर पळतात.
३. रासायनिक खतांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाण वापरूनही पिकांची आश्चर्यकारक वाढ.
४. जिवाणूंच्या संख्येवर अजिबात परिणाम होत नाही.
५. योग्य प्रमाणात वापरल्यास जमीन क्षारपड न होता सुपीक होते.
६. अत्यंत माफक दरात आणि कुठेही व केव्हाही उपलब्ध.
७. खारपाणपट्ट्यातील जमिनी मिठाच्या वापराने लागवडीयोग्य होतात असा अनुभव आहे.
प्र. : मीठ दर १५ दिवसांनी का वापरावे, महिन्यातून एकदा का नाही?
– एकदा मिठाने शेतीत प्रवेश केला की निसर्गाची ही अनमोल देणगी थोडाही वेळ वाया न घालविता शेतीला व शेतकऱ्याला मदत करण्यास सुरवात करते. दुष्काळी परिस्थितीत वातावरणातील आर्द्रता शोषून घेऊन पिकांना पाणी उपलब्ध करून देणे, पिकांच्या जोमदार वाढीसाठी त्यांना आवश्यक असलेल्या द्रव्यांचा पुरवठा करणे व पीकं कीटकांसाठी अखाद्य बनवून त्यांना कीटकांच्या हल्ल्यापासून वाचविणे अशी महत्त्वाची कामं मीठ एकाच वेळी करत असतं. पिकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ न देता एक एकरमध्ये जमिनीत टाकलेल्या १५ किलो मिठाचा प्रभाव १५ दिवसात संपुष्टात येतो आणि याच कारणासाठी दर १५ दिवसांनी शेतीत मिठाचा वापर करणे आवश्यक आहे.
प्र. : पिकांमध्ये कीटकनाशक म्हणून मीठ कसे काम करते?
– ब्रोमिन हा मिठाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि वातावरणात आर्द्रता वाढली की या घटकामुळेच मिठाला पाणी सुटत असते. त्याचे मिठामध्ये ६७.३ पीपीएम एवढे प्रमाण असते. शेतीत वापरल्या जाणारी अनेक कीटकनाशके या घटकावरच आधारित असतात. जमिनीतील किडींचा नायनाट करण्यासाठी व साठवणुकीत धान्याचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा जगभर मोठ्या प्रमाणात उपयोग केल्या जातो. पिकांना मीठ दिल्यानंतर त्यांनी खनिजं शोषून घेण्यास सुरवात केल्यानंतर त्यातील ब्रोमिन कीटकांना पिकांपासून दूर पळवते. पण शेतकऱ्यांनी केवळ त्याच्यावर अवलंबून न राहता पीक संरक्षणाचे एकात्मिक उपाय योजले (कीटकनाशकांमध्ये मीठ) तर अत्यंत महागड्या कीटकनाशकांवरील खर्च ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
प्र. : मीठ वापरण्यास सुरवात केल्यानंतर रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा वापर पूर्णपणे थांबवणे शक्य आहे का?
– शेती करण्याच्या पध्दतीत बदल करायचे असतील तर ते एका रात्रीत केल्यास धोकादायक ठरू शकतात. ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी रासायनिक शेती सोडून अचानक सेंद्रिय किंवा इतर कोणत्याही पध्दतीची शेती करण्यास सुरवात केली त्यांना हा अनुभव आला आहे. आपल्या देशात कोरडवाहू शेतीचे प्रमाण मोठे असल्यामुळे ती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत पहिल्या वर्षात शेतीच्या एक पंचमांश भागात (पाच एकर शेती असलेल्या शेतकऱ्याने फक्त एक एकरमध्ये) मिठाचा प्रयोग करावा आणि तोही एकात्मिक पध्दतीने. एकात्मिक पध्दत म्हणजे पहिल्या वर्षी किंवा खरीप हंगामात रासायन
मराठवाडा व महाराष्ट्रातील इतर काही भागांमध्ये पावसाने दडी मारली असली तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. थोडाही वेळ वाया न घालवता एकरी १५ किलो (खर्च फक्त ४५ ते ६० रुपये) खडे मीठ शेतात फेकून द्यावे. मीठ वातावरणातील आर्द्रता शोषून घेऊन पिकांना पाणी पुरवत राहते व पिके केवळ जिवंतच राहत नाहीत तर त्यांची जोमदार वाढही होते. हे सदर सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जे अनेक प्रश्न विचारले त्यातील काहींची उत्तरे.
प्र. : मिठाचा वापर कोणत्या प्रकारे व कोणत्या प्रमाणात करावा?
१. जमिनीत : एकरी ५० किलो मीठ शेतात फेकून त्यानंतर नांगरटी.
पीक १५ दिवसांचे झाल्यानंतर एकरी १५ किलो व त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने एकरी १५ किलो. फळझाडांसाठी हेच प्रमाण याच अंतराने पण रिंग पध्दतीने किंवा ड्रिपमधून.
२. कीटकनाशक म्हणून फवारणी करण्यासाठी : १ लीटर पाण्यात ५ ग्रॅम. (पाठीवरच्या साध्या पंपात ७५ ग्रॅम.) हे प्रमाण वाढविल्यास पिकांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
३. तणनाशक म्हणून फवारणी करण्यासाठी : १ लीटर पाण्यात २० ग्रॅम. (पाठीवरच्या साध्या पंपात ३०० ग्रॅम.) तणनाशक म्हणून तयार केलेले मिठाचे द्रावण मुख्य पिकावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
४. लव्हाळं व नागरमोथ्यासारख्या कंदवर्गीय तणांचा नाश करण्यासाठी साध्या पंपात ३०० ग्रॅम मिठाबरोबर एक मुठभर युरिया अवश्य टाकावा. युरियामुळे मीठ आंतरप्रवाही क्रियेने कंदांपर्यंत पोहोचून त्यांचा नाश करते. तणं जितकी कोवळी असतील तितका लवकर परिणाम होईल. गाजर गवताला मीठ जाळून टाकतं.
प्र. : रासायनिक खते व समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेले मीठ यात कोणता फरक आहे?
रासायनिक खते
१. नत्र, स्फुरद, पालाश ही केवळ ३ द्रव्ये उपलब्ध.
२. पिकांना दिल्यानंतर किडींची संख्या वाढते.
३. योग्य प्रमाणात न वापरल्यास पिकांच्या वाढीवर अयोग्य परिणाम होतो.
४. जमिनीतील जिवाणूंची संख्या कमी होते.
५. वर्षानुवर्षे वापरल्यास जमीन नापीक होते.
६. अत्यंत महागडी आहेत.
खडे मीठ
१. तब्बल ८२ द्रव्यांचा खजिना.
२. जमिनीतून दिल्यावर किंवा पिकांवर फवारल्यावर किडी दूर पळतात.
३. रासायनिक खतांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाण वापरूनही पिकांची आश्चर्यकारक वाढ.
४. जिवाणूंच्या संख्येवर अजिबात परिणाम होत नाही.
५. योग्य प्रमाणात वापरल्यास जमीन क्षारपड न होता सुपीक होते.
६. अत्यंत माफक दरात आणि कुठेही व केव्हाही उपलब्ध.
७. खारपाणपट्ट्यातील जमिनी मिठाच्या वापराने लागवडीयोग्य होतात असा अनुभव आहे.
प्र. : मीठ दर १५ दिवसांनी का वापरावे, महिन्यातून एकदा का नाही?
– एकदा मिठाने शेतीत प्रवेश केला की निसर्गाची ही अनमोल देणगी थोडाही वेळ वाया न घालविता शेतीला व शेतकऱ्याला मदत करण्यास सुरवात करते. दुष्काळी परिस्थितीत वातावरणातील आर्द्रता शोषून घेऊन पिकांना पाणी उपलब्ध करून देणे, पिकांच्या जोमदार वाढीसाठी त्यांना आवश्यक असलेल्या द्रव्यांचा पुरवठा करणे व पीकं कीटकांसाठी अखाद्य बनवून त्यांना कीटकांच्या हल्ल्यापासून वाचविणे अशी महत्त्वाची कामं मीठ एकाच वेळी करत असतं. पिकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ न देता एक एकरमध्ये जमिनीत टाकलेल्या १५ किलो मिठाचा प्रभाव १५ दिवसात संपुष्टात येतो आणि याच कारणासाठी दर १५ दिवसांनी शेतीत मिठाचा वापर करणे आवश्यक आहे.
प्र. : पिकांमध्ये कीटकनाशक म्हणून मीठ कसे काम करते?
– ब्रोमिन हा मिठाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि वातावरणात आर्द्रता वाढली की या घटकामुळेच मिठाला पाणी सुटत असते. त्याचे मिठामध्ये ६७.३ पीपीएम एवढे प्रमाण असते. शेतीत वापरल्या जाणारी अनेक कीटकनाशके या घटकावरच आधारित असतात. जमिनीतील किडींचा नायनाट करण्यासाठी व साठवणुकीत धान्याचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा जगभर मोठ्या प्रमाणात उपयोग केल्या जातो. पिकांना मीठ दिल्यानंतर त्यांनी खनिजं शोषून घेण्यास सुरवात केल्यानंतर त्यातील ब्रोमिन कीटकांना पिकांपासून दूर पळवते. पण शेतकऱ्यांनी केवळ त्याच्यावर अवलंबून न राहता पीक संरक्षणाचे एकात्मिक उपाय योजले (कीटकनाशकांमध्ये मीठ) तर अत्यंत महागड्या कीटकनाशकांवरील खर्च ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
प्र. : मीठ वापरण्यास सुरवात केल्यानंतर रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा वापर पूर्णपणे थांबवणे शक्य आहे का?
– शेती करण्याच्या पध्दतीत बदल करायचे असतील तर ते एका रात्रीत केल्यास धोकादायक ठरू शकतात. ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी रासायनिक शेती सोडून अचानक सेंद्रिय किंवा इतर कोणत्याही पध्दतीची शेती करण्यास सुरवात केली त्यांना हा अनुभव आला आहे. आपल्या देशात कोरडवाहू शेतीचे प्रमाण मोठे असल्यामुळे ती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत पहिल्या वर्षात शेतीच्या एक पंचमांश भागात (पाच एकर शेती असलेल्या शेतकऱ्याने फक्त एक एकरमध्ये) मिठाचा प्रयोग करावा आणि तोही एकात्मिक पध्दतीने. एकात्मिक पध्दत म्हणजे पहिल्या वर्षी किंवा खरीप हंगामात रासायन
No comments:
Post a Comment