Saturday, 12 May 2018

यशस्वी लागवड पेरूची



यशस्वी लागवड पेरूची


पेरूचे मूळस्थान मेक्सिको असून पेरूची लागवड, भारत, मलाया, ब्रम्हादेश, अमेरिका, दक्षिण चीन या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतामध्ये या फळझाडाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. लागवड आणि उत्पादनाच्या दृष्टीकोनातून या फळझाडाचा चौथा क्रमांक लागतो. भारतामध्ये ५३,००० हेक्टर क्षेत्रावर पेरूची लागवड असून प्रामुख्याने महाराष्ट्रा, उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात पेरू लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. महराष्ट्रात एकूण ४५०० हेक्टर क्षेत्रावर पेरू लागवड आहे. त्यामध्ये प्रमुख्याने नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये लागवड आढळून येते.

उपयोग - पेरूची साल व सुकलेली पाने यांचा भगवा रंग बनवून तो कपडे, रंगविण्याकरिता वापरला जातो. तसेच पेरूची साल 'आवे' विकारावर उत्तम गुणकारी आहे. सालीच्या रसाने जखमा बऱ्या होतात. साला पाण्यामध्ये उकळून गुळण्या केल्यास दाताचे दुखणे थांबते. पेरू स्वादिष्ट, तुरट, गोड, वीर्यवर्धक, ग्राही, थंड पित्तनाशक व रुचकर आहे. पेरू वातावर, बुद्ध कोष्ठतेवर गुणकारी आहे. पेरूच्या सालीमध्ये आणि सालीजवळील गरामध्ये 'क' जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते. मलावरोध रक्तविकार रक्तपित्त इ. विकारात पेरू अतिशय गुणकारी आहे. आवळ्यानंतर पेरूमध्ये सर्वात अधिक ' क' जीवनसत्त्वाचे प्रमाण असते.

तसेच ह्या फळापासून जाम, जेली, सॅलड, चीज, पुडींग, आईस्क्रिम व सरबत बनवितात. पेरूच्या जेलीला सर्व स्थरातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होते. आहारदृष्ट्या उत्तम, कणखर, कमी पाण्यावर येणारे व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर फळझाड म्हणून पेरूच्या लागवडीकडे पाहिले जाते.

महत्त्व : पेरूच्या प्रत्येक १०० ग्रॅम वजनामध्ये पाणी ७६.१%, प्रथिने १.५ %, स्निग्ध पदार्थ ०.२%, खनिजद्रव्य ०.८%, तंतुमय पदार्थ ६.९%, पिष्टमय पदार्थ १४.५%, चुना ०.०१%, स्फुरद ०.० ४% लोह १.० %, उष्मांक ६६ कॅलरी, जीवनसत्त्व ब - ३० एम.सी.जी. आणि जीवनसत्त्व क २५० ते ३०० मि.ग्रॅ. असते.

हवामान - पेरूची लागवड प्रामुख्याने उष्ण व समशीतोष्ण कटिबांधाच्या प्रदेशामध्ये केली जाते. कमाल व किमान उष्ण तापमानात फरक असलेल्या कोरड्या व उष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये पेरूचे उत्पादन चांगले येते. जास्त उष्णतामान असलेल्या प्रदेशापेक्षा हिवाळ्यामध्ये अधिक थंडी असलेल्या प्रदेशात फळांची गुणवत्ता अधिक चांगली राहते. जास्त पावसाच्या तसेच दमट हवामानाच्या भागामध्ये देवी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. तसेच ज्या भागामध्ये धुके अधिक पडते तेथे पेरूची लागवड करणे शकयतो टाळावे. पेरूचे झाड काटक तसेच पाण्याचा ताण सहन करणारे असल्याने दुष्काळी भागात देखील बाग पाण्याचा ताण सहन करते.

जमीन - पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या, हलक्या मध्यम ते काळ्या जमिनीत पेरूची लागवड करावी. दीड ते दोन फूट खोल काळ्या व त्याखाली मुरुमाचा थर असलेल्या जमिनीत पेरूची लागवड यशस्वी होऊ शकते. हलक्या जमिनीत लागवड केल्यास जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. सर्व साधारण जमिनीचा सामू ५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. चुनखाडीच्या, पाण्याचा निचरा न होणाऱ्या चोपण जमिनीत पेरूची लागवड करणे टाळावे.

सुधारित जाती - पेरूच्या गरावरून दोन जाती आढळून येतात. एक म्हणजे पांढऱ्या गराचा सफेद पेरू आणि दुसरा लाल गारच गुलाबी पेरू. सफेद पेरू गोडीला जास्त चांगला असून तो लोकप्रिय आहे. काही जाती प्रादेशिक नावावरून ओळखल्या जातात.

१) सरदार पेरू - पुर्वी ही जात लखनौ -४९ या नावाने प्रचलित होती. निवड पद्धतीने ही जात तयार करण्यात आली असून या जातीची झाडे उंच न वाढता पसरट (आडवी) वाढतात. पाने अंडाकृती असून दोन्ही टोकांकडे निमुळती होत जातात. फळे आकाराने मोठी व गोल असतात. शिवाय फळांत बियांनी संख्या कमी असते. गर, सफेद, घट्ट, मऊ, असून चवीस गोड असतो.

ही जात उत्पादनास चांगली असून महाराष्ट्रात या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

२) लखनौ ४६ - ही जात निवड पद्धतीने तयार केली असून या जातीचे झाड आकराने लहान असून फार सावकाश वाढते. पाने अंडाकृती दोन्ही टोकांकडे निमुळती असून आकाराने मोठी असतात. खोडाची साल राखी, करड्या रंगाची असून त्यावर हिरव्या रंगाचे ठिपके असतात. फळ अंडाकृती, मध्यम आकाराची असून फळाची साल गुळगुळीत असते व पिकल्यावर ती पिवळी पडते. गर गोड असून बिया मऊ असतात. उत्पादन सरदार जातीपेक्षा कमी आहे.

३) नाशिक - या जातीची झाडे सरळ व उंच वाढतात. फळ बाटलीसारखे देठाकडे निमुळते व लांब असते. फळाची साल खडबडीत असते. बिया गराच्या मध्यभागी एकवटलेल्या असतात. गर घट्ट व गोड असतो. फळ टणक टिकाऊ असते. म्हणून दूरच्या मार्केटला पाठविता येते. कँकर रोग या जातीवर कमी प्रमाणात आढळतो.

४) धारवाड - धारवाड जातीचे झाड मध्यम आकराचे असून फळ लहान असून देठाकडील भाग निमुळता असतो. फळे टणक व टिकाऊ असून बियांचे प्रमाण अधिक असते. या जातीचे उत्पादन कमी आहे.

५) ढोलका - या जातीचे झाड उंच असून घेर मोठा असतो. फळे आकाराने मोठी व त्यात बियांचे प्रमाण कमी असते. गर गोड असतो. उत्पदान साधारण आहे.

अभिवृद्धी - पेरूची अभिवृद्धी ही बियांपासून तसेच कलमापासून केली जाते. बियांपासून तयार केलेल्या झाडांचे उत्पादन, फळांची प्रत याविषयी खात्री देता येत नाही. त्याकरिता इच्छित गुणधर्म टिकविण्यासाठी दाब कलम, भेटकलम, गुटीकलम या पद्धतींचा अवलंब केला जातो.

दाबकलम - दाब कलम यास 'जिभली' कलम असेही म्हणतात. दाब कलम करण्यासाठी खोडालगतच्या व जमिनीवर टेकवता येतील अशा फांद्या निवडाव्यात या फांद्या जोमाने वाढणाऱ्या पण जास्त जुन्या किंवा कोवळ्या नसाव्यात. निवडलेल्या फांदीला खालील बाजूस काप द्यावा. हा काप खालील बाजूने फांदीच्या मध्य भागाकडे शेंड्याच्या दिशेने तिरपा २ ते ३ सें. मी. काप घ्यावा. हा भाग जिभलीसारखा दिसतो म्हणून याला 'जिभली' कलम असेही म्हणतात. काप घेतलेला खालील भाग जमिनीवर अगर कुंडीमध्ये (परळीत) वाकवून मातीत गाडावा. अशा फांदीच्या १५ सेमी लांबीवरील पाने काढून टाकवीत. हा भाग पक्व असावा. पाने काढताना डोळ्यास इजा होणार नाही. याकडे लक्ष द्यावे. जमिनीवर टेकलेल्या डोळ्यापैकी एका चांगल्या डोळ्याची निवड करावी. त्या डोळ्याच्या खोडाकडे अर्धा सेंमी अंतरापासून फांदीच्या शेंड्याकडे खोल काप घ्यावा. या कापाची लांबी मध्यभागातून २ ते ३ सेंमी असावी. कापाचे दोन्ही भाग एकत्र जोडले जाऊ नये म्हणून त्यामध्ये बारीकशी काडी घालावी. या कापाला जर्मिनेटर चा (१लि. पाण्यामध्ये २५ मिली जर्मिनेटर) वापर केल्यास मुळ्या लवकर व अधिक प्रमाणात फुटतात.

हा कलम केलेला भाग काळजीपुर्वक मातीत दाबावा व पाणी द्यावे. कलम केलेली फांदी वर उचलली जाऊ नये म्हणून त्यावर लहानसा दगड ठेवाव. कलमास १ महिन्यानंतर मुळ्या फुटण्यास सुरुवात होते. मुळ्यांची वाढ होऊन कलमे झाडापासून वेगळी करण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागतो.

कलम मातृवृक्षापासून वेगळे केल्यानंतर ते सरळ आणि व्यवस्थित करावे. रोप काही दिवस सावलीत ठेवून नंतर कायम जागी लावावे.

लागवड - साधारणपणे मे महिन्यात जमिनीची आखणी करून १५ x १५ फुट अंतरावर २ x २ x २ आकाराचे खड्डे घ्यावेत. हे खड्डे भरताना तळाशी पालापाचोळा घालून त्यावर १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत टाकून चांगल्या मातीने खड्डे भरून घ्यावेत. उन्हाळी जोराचा पाऊस संपल्यानंतर कलम केलेली रोपे त्यामध्ये लावावीत. थेट कलम केलेली रोपे लावताना कलम केलेला भाग जमिनीपासून १५ ते २० सें.मी. वर राहील अशा पद्धतीने लावावीत.

खत : लागवडीनंतर लहान झाडांची जोमाने वाढ करण्याच्या हेतूने पहिले ४ वर्षे फळे घेण्यास सुरुवात करेपर्यंत द्यावीत. त्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे असावे.

१) एक वर्षाच्या झाडास ५ ते ६ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

२) दुसऱ्या वर्षी झाडास १० ते १२ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

३) तिसऱ्या वर्षी १५ ते १८ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि ७५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

४) चौथ्या वर्षी २० ते २५ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

५) पाचव्या वर्षी तसेच त्यापुढील प्रत्येक वर्षी २५ ते ३० किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि १ ते १.५ किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरावे.

वरील खते वापरताना ती खोडाभोवती बांगडी पद्धती ने गाडून द्यावीत. खत दिल्यानंतर बागेस पाणी द्यावे.

पाणी - पेरूची झाडे लहान असताना पाण्याच्या पाळीतील अंतर कमी ठेवावे. पाण्याच्या पाळीतील अंतर वाढल्यास एकदम जादा पाणी देण्यापेक्षा अंतर कमी ठेवून बेताने पाणी द्यावे. दिलेल्या पाण्याचा झाडांना योग्य उपयोग व्हावा. याकरीता खोडाभोवती आळी किंवा वाफे बांधून घ्यावेत. वाफ्यात किंवा आळ्यात दिलेले पाणी खोडाला लागू नये म्हणून खोडाभोवती मातीचा उंचवटा करावा. बागेस उन्हाळ्यामध्ये १० ते १५ दिवसांच्या अंतराने तर हिवाळ्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने आणि पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे. याप्रमाणे माल चालू होईपर्यंत ४ वर्षापर्यंत पाणी द्यावे. बहार धरल्यानंतर फुले निघाल्यापासून फळे तयार होईपर्यंत आणि विशेषत: फळे पोसण्याच्या काळामध्ये बागेस पाणी वेळेवर नियमित द्यावे. फळांची काढणी झाल्यानंतर दुसऱ्या बहाराची फुले लागेपर्यंत गरजेपुरतेच पाणी द्यावे.

बहार धरणे - पेरूला वर्षातून ३ वेळा बहार येतो. बहाराची फुले जून, ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात येतात. जूनमध्ये फुले येणार्या बहाराला मृग बहार तर जानेवारी महिन्यात फुले येणाऱ्या बहाराला आंबेबहार म्हणतात.

स्थानिक परिस्थिती आणि मार्केटचा अभ्यास करून वर्षातून एकच बहार घेतल्याने उत्पादन अधिक चांगल्या प्रतिचे मिळते. तसेच पाणी तोडणे, पाणी देणे, मशागत करणे रोगराईचा बंदोबस्त करणे इ. गोष्टी सुलभतेने करता येतात. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केला असता 'मृग बहार' धरणे किफायतीशीर ठरते. मृग बहाराची फळे धरण्यासाठी बागेस फेब्रुवारी ते मे मध्ये ताण द्यावा. फेब्रुवारी ते मे उन्हाळाच असल्याने बागेस ताण देणे सोपे होते. मृग बहाराची फळे हिवाळ्यात तयार होतात. त्यामुळे फळमाशीचा उपद्रव कमी होतो. तसेच फळे चांगल्या प्रतीची मिळतात.

भारी जमिनीत ४० ते ६० दिवसांचा ताण द्यावा. हलक्या जमिनीस ३० ते ३५ दिवसांचा ताण द्यावा. पाणी तोडल्यामुळे झाडाची वाढ थांबते व पाणगळ होते. त्यामुळे झाडांना संपूर्ण विश्रांती मिळून झाडांमध्ये अन्नद्रव्याची साठवण होते आणि ह्या अन्नद्रव्याचा पुढे पाणी दिल्यानंतर फुलोरा तयार होण्यास चांगला फायदा होतो. अर्धवट पानगळ झाल्यानंतर बागेतील जमिनीची मशागत करण्याकरीता हलकीशी खाणणी किंवा नांगरणी करावी. भारी जमिनीत पानांची गळ लवकर होत नाही. म्हणून खोल नांगरणी करावी. बागेतील तण पुर्णपणे काढून जमीन भुसभुशीत करावी.

ताण देताना काळजीपुर्वक द्यावा, जर जास्त ताण दिल्यास पानगळ अधिक होऊन फुले धरणाऱ्या काड्यांची मर होते व त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. मे महिन्यात खत देऊन खोडाभोवती मातीची हुंडी करून आळी किंवा वाफे बांधणी करावी.

छाटणी (झाडांना आकार देणे) - झाड लहान असल्यापासून त्याला वळण देणे गरजेचे असते. सुरुवातीला मुख्य खोडावरच झाडाची वाढ करून घ्यावी. त्यासाठी १ ते १।। फुटापर्यंत होणारी फूट काढून टाकावी. त्यानंतर झाडाचा गोलाकार घेर होईल अशा पद्धतीने ३ ते ४ फांद्या वाढवाव्यात. किडलेल्या किंवा वाळलेल्या फांद्या छाटाव्यात. तसेच गर्दी करणाऱ्या फांद्या आणि जमिनी लगतची फूट काढावी. जुन्या झाडांची छाटणी केल्यानंतर त्याच्यावर नवीन फूट येते व त्यामुळे त्यांना नवजीवन मिळते.

पेरूच्या झाडाला नवीन फुटीवर फुले व फळे येतात. या नवीन फुटी येण्यासाठी छाटणी करणे आवश्यक आहे. झाडांची छाटणी एप्रिल - मे महिन्यात करावी. झाडांची जास्त छाटणी केली तर उत्पादन कमी येते. मात्र फळांचा आकार, वजन व फळाची प्रत

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...