*ऊस पिकातील हुमणी आळीचे नियंत्रण करणे गरजेचे*
भेंडा-- यावर्षीच्या उन्हाळ्यातील तपमान जास्त असल्यामुळे व नगर जिल्हयात अद्याप ही पुरेसा पाऊस न झाल्याने ऊस पिकात हुमणी अळीचे भुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात अंडी घालून हुमणी अळीची निर्मिती होत आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियंत्रणाचे उपाय करून अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जन्मलेली अळी ऊस व इतर संवर्ग पिके(ज्वारी,बाजरी, मका इ.) खाऊन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते.झालेल्या नुकसानीचे गांभीर्य ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्याच्या लक्षात येते.तोपर्यंत मोठे नुकसान झालेले असते.अशा वेळी हुमणी अळीचे नियंत्रण करणे अतिशय अवघड होते.म्हणून हुमणी अळीचा प्रादुर्भाव होण्या अधीच जून महिन्यातच हुमणी अळीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.
*हुमणी अळीचे जीवन चक्र*
-----------------------------------
अंडी,अळी, कोष व पतंग या आवस्थांमधून हुमणी किडीचे जीवन चक्र पूर्ण होते.
1) *भुंगेरे*:-- भुंगेरे निशाचर असतात.होलोट्रॅकीयाचे भुंगे गडद विटकरी रंगाचे असतात.त्यांची लांबी 2.5 सेंमी व रुंदी 1 सेंमी असते.पंख जाड व टणक असतात.पाय तांबूस रंगाचे असतात.नर व मादी या दोन्ही मध्ये मिशा असतात.नर भुंग्यात मिशीची गाठ मोठी असते व उडतांना घुं s s असा आवाज येतो.पहिल्या वळीवाच्या पावसा नंतर सायंकाळी भुंगे जमिनीतून बाहेर येतात आणि नर मादीचे मिलन होते.त्यानंतर ही भुंगे कडुनिंब ,बाभळी किंवा शेताभोवती असणाऱ्या झाडा झुडपावर जाऊन बसतात.पुन्हा सूर्योदयापूर्वी जमिनीत घुसून बसतात.
*2)अंडी*:-- जमिनीत 4 इंच खोलीवर मादी अंडी घालते. दररोज एक या प्रमाणे 60 दिवस अंडी घालते.अंडे ज्वारी किंवा मटकीच्या आकाराचे असतात.सुरुवातीला पांढरे नंतर तांबूस गोलाकार होतात.त्यांची लांबी 3.65 मिमी व रुंदी 2.15 मिमी असते.अंड्यातून 10 ते 15 दिवसानी अळी बाहेर पडते.
3) *अळी*:-- पावसाळ्याच्या सुरुवातीला घालायला सुरुवात होते.अंड्यातून बाहेर आलेली अळी पांढरट असते.अळीच्या 3 अवस्था असतात.पहिली अवस्था 25 ते 30 दिवस,दुसरी अवस्था 30 ते 45 दिवस आणि तिसरी अवस्था 140 ते 145 दिवसाची असते.पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी 45 ते 65 मिमी लांब,12 मिमी जाडीची असून इंग्रजी C आकाराची असते.रंग पिवळसर पांढरा असतो ,जबडा मजबूत असतो, डोळे तांबूस ते गडद तांबूस असतात.
4) *कोष*:--- या किडीचा कोष पांढरा असतो.ऑगस्ट ते मार्च या महिन्यात ती शेतात राहतात,कोषा भोवती मातीचे आवरण करून स्वसंरक्षण करते.कोषातून बाहेर पडलेले भुंगे 4 ते 5 महिने जमिनीतच सुप्त अवस्थेत राहतात.पहिल्या वळीवाच्या पावसानंतर बाहेर येतात.कडुनिंब,बाभूळ,चिंच, बोर,शेवगा,गुलमोहर अश्या शेता भोवतीच्या झाडा झुडपावर गुजराण करतात.यांचा काळ 90 ते 110 दिवसांचा असतो.एका वर्षात हुमणीची एक पिढी पूर्ण होते.
*हुमणी अळीचे नियंत्रण*
--------------------------------
1) *जैविक नियंत्रण*
---------------------
1) मेटारायझियम व बिव्हेरिया एकरी प्रत्येकी 2 लिटर याप्रमाणे ड्रीप किंवा शेणखत,कंपोस्ट खातात मिसळून जमिनीला वापसा असतांना द्यावे.
2) निंबोळी पेंड,करंज पेंड,तंबाखू डस्ट तिन्ही एकत्र मिसळून एकरी प्रत्येकी 200 ते 250 किलो रासायनिक खत किंवा इतर खतांबरोबर द्यावे.
3) कीडग्रस्त क्षेत्रात एकरी 1 ते 1.25 लाख परोपजीवी ट्रायकोग्रामा सोडावेत.
2) *तांत्रिक नियंत्रण*
-------------------
प्रकाश सापळ्यांचा वापर करणे किंवा प्रकाश सापळे उपलब्ध नसल्यास प्लॅस्टिक घमेल्यात रासायनिक औषध व पाणी मिसळून त्यावर इलेक्ट्रिक बल्ब लावला असता रात्री हुमणी किडीचे भुंगेरे घमेल्यात जमा होऊन मरतात.ही उपाय योजना जून महिन्याचे सुरुवातीला केल्यास प्रौढ अवस्थेतील भुंगेरे मरतात व पुढील काळात हुमणी अळीचा होणारा त्रास आपोआप नियंत्रणात येतो.
3) *रासायनिक उपाय योजना*
-------------------------------
1) रिजेंट एकरी 10 किलो किंवा 8 किलो फरटेरा या रासायनिक औषधांचा वापर करावा.
2) क्लोरोपायरीफॉस (50 टक्के) अधिक सायपर मिथ्रीन (5 टक्के) (हामला ,कॅनॉन इ.) एकरी 2 लिटर याप्रमाणे ड्रीप अथवा ड्रेनचिंग करावे.
3) क्लोथ्रीडयानील (50 टक्के डब्लूडिजी) (डेंटासु) 150 ग्राम प्रति एकर वापरावे.
4) इमीडाक्लोपीड (40 टक्के) अधिक फिप्रोनील (40 टक्के) (लेसेंटा) 150 ग्राम प्रति एकर वापरावे.
5) जून,जुलै मध्ये एकरी 10 किलो क्विनॉलफॉस दाणेदार शेतात घालावे.
हुमणी पासून ऊस व इतर पिकाचे दरवर्षी होणाऱ्या मोठे नुकसान टाळण्यासाठी वरील प्रमाणे उपाय योजना कराव्यात.हुमणी कीड नियंत्रणासाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा.
भेंडा-- यावर्षीच्या उन्हाळ्यातील तपमान जास्त असल्यामुळे व नगर जिल्हयात अद्याप ही पुरेसा पाऊस न झाल्याने ऊस पिकात हुमणी अळीचे भुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात अंडी घालून हुमणी अळीची निर्मिती होत आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियंत्रणाचे उपाय करून अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जन्मलेली अळी ऊस व इतर संवर्ग पिके(ज्वारी,बाजरी, मका इ.) खाऊन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते.झालेल्या नुकसानीचे गांभीर्य ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्याच्या लक्षात येते.तोपर्यंत मोठे नुकसान झालेले असते.अशा वेळी हुमणी अळीचे नियंत्रण करणे अतिशय अवघड होते.म्हणून हुमणी अळीचा प्रादुर्भाव होण्या अधीच जून महिन्यातच हुमणी अळीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.
*हुमणी अळीचे जीवन चक्र*
-----------------------------------
अंडी,अळी, कोष व पतंग या आवस्थांमधून हुमणी किडीचे जीवन चक्र पूर्ण होते.
1) *भुंगेरे*:-- भुंगेरे निशाचर असतात.होलोट्रॅकीयाचे भुंगे गडद विटकरी रंगाचे असतात.त्यांची लांबी 2.5 सेंमी व रुंदी 1 सेंमी असते.पंख जाड व टणक असतात.पाय तांबूस रंगाचे असतात.नर व मादी या दोन्ही मध्ये मिशा असतात.नर भुंग्यात मिशीची गाठ मोठी असते व उडतांना घुं s s असा आवाज येतो.पहिल्या वळीवाच्या पावसा नंतर सायंकाळी भुंगे जमिनीतून बाहेर येतात आणि नर मादीचे मिलन होते.त्यानंतर ही भुंगे कडुनिंब ,बाभळी किंवा शेताभोवती असणाऱ्या झाडा झुडपावर जाऊन बसतात.पुन्हा सूर्योदयापूर्वी जमिनीत घुसून बसतात.
*2)अंडी*:-- जमिनीत 4 इंच खोलीवर मादी अंडी घालते. दररोज एक या प्रमाणे 60 दिवस अंडी घालते.अंडे ज्वारी किंवा मटकीच्या आकाराचे असतात.सुरुवातीला पांढरे नंतर तांबूस गोलाकार होतात.त्यांची लांबी 3.65 मिमी व रुंदी 2.15 मिमी असते.अंड्यातून 10 ते 15 दिवसानी अळी बाहेर पडते.
3) *अळी*:-- पावसाळ्याच्या सुरुवातीला घालायला सुरुवात होते.अंड्यातून बाहेर आलेली अळी पांढरट असते.अळीच्या 3 अवस्था असतात.पहिली अवस्था 25 ते 30 दिवस,दुसरी अवस्था 30 ते 45 दिवस आणि तिसरी अवस्था 140 ते 145 दिवसाची असते.पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी 45 ते 65 मिमी लांब,12 मिमी जाडीची असून इंग्रजी C आकाराची असते.रंग पिवळसर पांढरा असतो ,जबडा मजबूत असतो, डोळे तांबूस ते गडद तांबूस असतात.
4) *कोष*:--- या किडीचा कोष पांढरा असतो.ऑगस्ट ते मार्च या महिन्यात ती शेतात राहतात,कोषा भोवती मातीचे आवरण करून स्वसंरक्षण करते.कोषातून बाहेर पडलेले भुंगे 4 ते 5 महिने जमिनीतच सुप्त अवस्थेत राहतात.पहिल्या वळीवाच्या पावसानंतर बाहेर येतात.कडुनिंब,बाभूळ,चिंच, बोर,शेवगा,गुलमोहर अश्या शेता भोवतीच्या झाडा झुडपावर गुजराण करतात.यांचा काळ 90 ते 110 दिवसांचा असतो.एका वर्षात हुमणीची एक पिढी पूर्ण होते.
*हुमणी अळीचे नियंत्रण*
--------------------------------
1) *जैविक नियंत्रण*
---------------------
1) मेटारायझियम व बिव्हेरिया एकरी प्रत्येकी 2 लिटर याप्रमाणे ड्रीप किंवा शेणखत,कंपोस्ट खातात मिसळून जमिनीला वापसा असतांना द्यावे.
2) निंबोळी पेंड,करंज पेंड,तंबाखू डस्ट तिन्ही एकत्र मिसळून एकरी प्रत्येकी 200 ते 250 किलो रासायनिक खत किंवा इतर खतांबरोबर द्यावे.
3) कीडग्रस्त क्षेत्रात एकरी 1 ते 1.25 लाख परोपजीवी ट्रायकोग्रामा सोडावेत.
2) *तांत्रिक नियंत्रण*
-------------------
प्रकाश सापळ्यांचा वापर करणे किंवा प्रकाश सापळे उपलब्ध नसल्यास प्लॅस्टिक घमेल्यात रासायनिक औषध व पाणी मिसळून त्यावर इलेक्ट्रिक बल्ब लावला असता रात्री हुमणी किडीचे भुंगेरे घमेल्यात जमा होऊन मरतात.ही उपाय योजना जून महिन्याचे सुरुवातीला केल्यास प्रौढ अवस्थेतील भुंगेरे मरतात व पुढील काळात हुमणी अळीचा होणारा त्रास आपोआप नियंत्रणात येतो.
3) *रासायनिक उपाय योजना*
-------------------------------
1) रिजेंट एकरी 10 किलो किंवा 8 किलो फरटेरा या रासायनिक औषधांचा वापर करावा.
2) क्लोरोपायरीफॉस (50 टक्के) अधिक सायपर मिथ्रीन (5 टक्के) (हामला ,कॅनॉन इ.) एकरी 2 लिटर याप्रमाणे ड्रीप अथवा ड्रेनचिंग करावे.
3) क्लोथ्रीडयानील (50 टक्के डब्लूडिजी) (डेंटासु) 150 ग्राम प्रति एकर वापरावे.
4) इमीडाक्लोपीड (40 टक्के) अधिक फिप्रोनील (40 टक्के) (लेसेंटा) 150 ग्राम प्रति एकर वापरावे.
5) जून,जुलै मध्ये एकरी 10 किलो क्विनॉलफॉस दाणेदार शेतात घालावे.
हुमणी पासून ऊस व इतर पिकाचे दरवर्षी होणाऱ्या मोठे नुकसान टाळण्यासाठी वरील प्रमाणे उपाय योजना कराव्यात.हुमणी कीड नियंत्रणासाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment