आंतरपीक पद्धतीचे फायदे : -
१) आंतरपीक पद्धतीमुळे आपल्याकडे मुळातच कमतरता असलेल्या जमीन आणि पाणी (जमिनीतील ओलावा) या नैसर्गिक साधन संपत्तीचा अधिक कार्यक्षमतेने वापर करता येतो.
२) एक पीक सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये निघते तर दुसरे डिसेंबर/जानेवारीपर्यंत शेतात राहते. त्यामुळे पावसाळ्यातील पावसाच्या जमिनीत शिल्लक राहिलेल्या ओलाव्याचा बाष्पीभवनाद्वारे अपव्यय न होता त्याचा उपयोग जमिनीत उभ्या असलेल्या पिकाची वाढ आणि उत्पादनासाठी होतो.
३) दुबार पीक पद्धतीत दुसऱ्या पिकासाठी पूर्व मशागत करत असताना जमिनीतील औलावा कमी होतो. हे आंतरपीक पद्धतीत टाळले जाते. एक पीक निघाले तरी जमीन दुसऱ्या पिकाने झाकलेली राहिल्याने ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
४) सलग पिकापेक्षा आंतरपीक पद्धतीत तण, रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
५) एका पिकाचा दुसऱ्या पिकाच्या वाढीसाठी गरजेनुसार आधार व सावली मिळू शकते.
६) आंतरपीक पद्धतीत संपूर्ण शेत पिकाच्या छायेखाली येत असल्याने जमिनीची धूप टाळण्यास मदत होते.
७) ज्या क्षेत्रात सिंचनाची सुविधा नाही म्हणून दुबार पीक घेता येत नाही. अशा क्षेत्रात आंतरपीक पद्धतीच्या माध्यमातून खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम पीक उत्पादनासाठी वापरले जात असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात सातत्य राहण्यास मदत होते.
८) वर्षातून एकच पीक घेण्याऐवजी एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके घेतल्याने शेतकऱ्यांची स्वत:ची विविध पिकाविषयीची कौटुंबिक गरज तर भागतेच शिवाय एकूण आर्थिक उत्पादनात भरीव वाढ होते.
९) कोरडवाहू शेतीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे म्हणजे उशिरा पेरणी, पावसातील खंड, हंगामाच्या शेवटी पाऊस न होणे किंवा अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक जाण्याचे धोके अलीकडील काळात वाढले आहेत. हवामान बदलाचे शेतीवरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धत घेणे हा उत्तम मार्ग आहे. लवकर किंवा उशिरा येणाऱ्या पिकांपैकी एका पिकाचे नुकसान झाले तरी एक पीक वाचण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे संपूर्ण नापिकीपासूने शेतकरी वाचू शकतो.
🍃🍃🍃 -ZBNFSP 🍃🍃🍃
१) आंतरपीक पद्धतीमुळे आपल्याकडे मुळातच कमतरता असलेल्या जमीन आणि पाणी (जमिनीतील ओलावा) या नैसर्गिक साधन संपत्तीचा अधिक कार्यक्षमतेने वापर करता येतो.
२) एक पीक सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये निघते तर दुसरे डिसेंबर/जानेवारीपर्यंत शेतात राहते. त्यामुळे पावसाळ्यातील पावसाच्या जमिनीत शिल्लक राहिलेल्या ओलाव्याचा बाष्पीभवनाद्वारे अपव्यय न होता त्याचा उपयोग जमिनीत उभ्या असलेल्या पिकाची वाढ आणि उत्पादनासाठी होतो.
३) दुबार पीक पद्धतीत दुसऱ्या पिकासाठी पूर्व मशागत करत असताना जमिनीतील औलावा कमी होतो. हे आंतरपीक पद्धतीत टाळले जाते. एक पीक निघाले तरी जमीन दुसऱ्या पिकाने झाकलेली राहिल्याने ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
४) सलग पिकापेक्षा आंतरपीक पद्धतीत तण, रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
५) एका पिकाचा दुसऱ्या पिकाच्या वाढीसाठी गरजेनुसार आधार व सावली मिळू शकते.
६) आंतरपीक पद्धतीत संपूर्ण शेत पिकाच्या छायेखाली येत असल्याने जमिनीची धूप टाळण्यास मदत होते.
७) ज्या क्षेत्रात सिंचनाची सुविधा नाही म्हणून दुबार पीक घेता येत नाही. अशा क्षेत्रात आंतरपीक पद्धतीच्या माध्यमातून खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम पीक उत्पादनासाठी वापरले जात असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात सातत्य राहण्यास मदत होते.
८) वर्षातून एकच पीक घेण्याऐवजी एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके घेतल्याने शेतकऱ्यांची स्वत:ची विविध पिकाविषयीची कौटुंबिक गरज तर भागतेच शिवाय एकूण आर्थिक उत्पादनात भरीव वाढ होते.
९) कोरडवाहू शेतीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे म्हणजे उशिरा पेरणी, पावसातील खंड, हंगामाच्या शेवटी पाऊस न होणे किंवा अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक जाण्याचे धोके अलीकडील काळात वाढले आहेत. हवामान बदलाचे शेतीवरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धत घेणे हा उत्तम मार्ग आहे. लवकर किंवा उशिरा येणाऱ्या पिकांपैकी एका पिकाचे नुकसान झाले तरी एक पीक वाचण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे संपूर्ण नापिकीपासूने शेतकरी वाचू शकतो.
🍃🍃🍃 -ZBNFSP 🍃🍃🍃
No comments:
Post a Comment