Friday, 27 April 2018

ऊसासाठी पाण्याचे नियोजन.

       ऊसासाठी पाण्याचे नियोजन -    

          ऊसाचे मूळ परिसरात जेवढे पाणी उपलब्ध होइल तेवढेच फक्त वापरू शकते. मुलांच्या परिसरावरती अथवा खाली कितीही पाणी असले तरी त्याचा पिकाच्या दृष्टिने फारसा उपयोग होत नाही. दिलेले पाणी मुळाच्या परिसरात कसे राहील यावरच त्या पाण्याची उपयुक्तता अवलंबून असते. अथवा मूळांची वाढ भरपूर ती मुळे जमिनीच्या सर्व थरात कशी खालीवर खोल पसरतील हे पाहिले तरी पाण्याचा वापर योग्य त-हेने होण्यास मोठी मदत होते. भारी जमिनीचा पाण्याचा निचरा होण्याची क्षमता फारच कमी असते. त्यामुळे एकावेळी पाणी जास्त दिल्यास मुळांचे परिसरातील प्राणवायुचे प्रमाण घटल्याने मूळांची कार्यक्षमता एकदम कमी होऊन उभार वाढ खुंटते, नविन फुटवे येत नाहीत. आधी आलेले फुटवे मलूल होतात व् एकंदर पिकाचा जोरच कमी होतो. स-या तुडुम्ब भरुन पाणी वाहू लागेल अशा पद्धतीने पिकाला पाणी दिलेस वर उल्ल्हेख केलेले धोके प्रकर्षाने जाणवतात. माफक व मुरेल तेवढे पाणी एकावेळी पिकाला देणे नेहमीच फायदेशीर ठरते.

    "थोड़े थोडे आणि सारखे सारखे पाणी द्यावे"

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...